Powered By Blogger

Thursday, 31 January 2019

अनेकांच्या अनेक अश्या नात्यांना साक्ष ठरणारी हिचं ती वाटिका....!


       आता दिल्लीचं वारं आमच्या पर्यंत ही फोफावल होत,विद्यमान पंतप्रधानांनी घेतलेला तो नोटबंदी आणि त्याला सबळ देणारा तो कॅशलेस चा निर्णय आमच्या पदरी पडणं यात काही वावगं नाही बरें.त्यांनी आदेशी काढलेले निर्णय हे योग्यचं,परंतु या सर्व प्रकरणात आम्ही मात्र होरपळून निघालो.तर याचं निर्णयाचं स्वागत करीत आम्ही ही ATM च्या रांगेत निघालो खरें,परंतू काही दिवसांपूर्वी चं महाविद्यालयातील ATM मधील रक्कम तळाला गेलेली होती,ना इलाजस्तव नगरामध्ये (गावामध्ये) धाव घेण्यापलीकडे दुसरा पर्यायी मार्ग ही नव्हताच.

      माझ्या काही अति जवळील हितचिंतकान सह आम्ही नगरी मध्ये आपल्याचं पैशाचं समीकरण बांधण्यास निघाेलो खरे.आता रस्ताने अति शिस्तीत आणि शांततेत मार्गक्रमण करणाऱ्यांमध्ये आम्ही मोडत नव्हतोचं.तर पहाटेच्या सूर्योदया पासनं तर सूर्यास्ता ला येऊंन ठेपतील त्या सर्व अश्या उत्कट बाबी आम्ही चर्चेस उतरलो खरें, तरी माझं च खरं हा.....!असं रेट-रेटून सिद्ध करण्यास जो पहावा तो मात्र मंत्रमुग्ध होता.चर्चेला उधाण येऊन ठेवलं होतं तर दुसरी कडं जिथं जायचं होतं ते स्थळ मात्र छातीवर चं होत.

        तशी पैश्यांची चणचण सर्वांनाच हो....!परंतु आधी मात्र कोण त्या ATM वरती झडप घालतो यातं च सर्वांची कसरत होऊ लागली नक्की.तसं एक वेळीं एकाचं ग्रहकां न ATM च्या खोलीत शिराव हा नियम तर आम्ही समूहाने आत शिरत चं मोडीत काढला होता. आपल्याला लागतील अशी सुटसुटीत रोकड आम्ही आगलत केली खरी. आता अगदी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू ररामचंद्रांन सारखे मर्यादित ही आम्ही नसावेत; याला परिपक्व ताळमेळ बसावा म्हणून आता आलो चं तर सक्तीन दिलेल्या त्या निर्दोष पोटाचं तिळमात्र तरी सांतवन करावं तर लागूनच असलेल्या चौपाटी ला आम्ही  सरेआम दत्तक दिली.सगळें आता आप-आपल्या चिभेच्या चोचल्यानां त्या खानावळीतील (मेस) निरागस चवीला राराम ठोकत आज दिलखुलास होणार होतें.

          आतां सर्वचं बाहेर अल्पउफार करतील मग आपणचं का ? मागे सरायचं;याचं भावनेला साद देत मी मार्गस्थ झालो खरा...!आपल्याला हवं-हवं ते सारं जो तो मागवत होता आणि मी पण तसंच करून मोकळं झालो.ऑर्डर केल्यानंतर १५ मिनिटांनी चं आपला मेनू मिळेल अशी सक्त ताकीत त्या मेनू बोर्ड च्या तळाला टिप्पणी लिहिलेली होती, आता हा मात्र आम्हाला आलेला गहन प्रश्न च ना.....!नेमकं करावं तरी काय इतक्या वेळ? तर सहज पणे माझं लक्ष वेधून घेईल असा प्रेमाचा झरा उतू जात असलेलं नित्रदीप चित्र निदर्शनास आलं. काय जिव्हाळा हो त्या घास भरवण्यात......! मी तर दंगच होऊन नाहलो. एक प्रियकर त्याची समजल्या जाणाऱ्या (अर्थात अनेकां न पैंकी तो तिचा एक.....आता असें किती याचा विचार न केलेलाच बरा)
प्रियसीला पाणीपुरी चे फुग्गे अलगत चं भरवत होता. काय नजारा ना.....एक पाणीपुरी त्या फुग्गे वाल्यानी प्रियकराला द्यावी नि नंतर त्याने ती अलगत हस्तगत करत तिची शहानिशा करावी नि त्या प्रियसीला द्यावी.........व्हा.....!

         काय प्रेम ना,नाही म्हणजे आमच्या पदरी फक्त दूरदर्शन आलं असावं या बाबतीत कारण असं काही अद्यायत आमच्या सोबत घडलं च नव्हतं तर आम्हांला ते दृश्य च कौतुकास्पद चं हो....!त्या ऐतिहासिक क्षणाचे आम्हीं मात्र साक्षीदार होतो, हेंच आमचं आहोभाग्य समजून आम्ही सारे एकांकि विचारत गेलो नि एक-मेकांसी सांगू लागलो की धिर धर भावा....... होईल,जर भाग्यात असेल तर हाही सोनियाचा दिन नक्कीचं उजाडेल. अश्या तिव्र विचारमंथनात आम्हीं दिलेली ऑर्डर केव्हां फळाला आली हेही आम्हांस कळलं नाही.आता आपल्याला कुणी प्रियसी त्याचं प्रेमानं काही ती मेजवानी भरवेल असं बलाढ्य मनमोकळ्या मनाने आम्ही स्वतःच स्वताला भरवण्यास श्रीगणेशा केलां.

            आज जे काही दृष्य आम्हीं उगढ्या डोळ्यांनी बघितलं,यांची चं काही शी जखम माझ्या एका मित्राला खोलवर टोचल्या गेली होती,त्याचं मन काही धिर घेईना. याचं दृष्याचा सबळ संदर्भ पुरावा घेत साहेबांनि,तो पूर्ण वाटिका परिसर पिंजून काढला, जे आधी बघितलं ते त्यांस वारंवार निदर्शनास येऊ लागलं मात्र या वेळेस काही शी परिस्थिती विचित्र होती.तसं साधारणतः आमच्या महाविद्यालयातिल विद्यार्थीआणि विध्यार्थीनी आळी-पाळीने येत असतात आता ते कोण कुणा सोबत येतं य हे मात्र गोपीनिय बाबा या बद्दल तो माझ्या कडं काही पुटपुटला नाही.तरी त्याची मानसिक स्थिती अजून ही काही स्थिर नव्हतीच.मी हळूच एका घनिष्ट सहकारी या नात्याने त्याला विचारलं......
  काय रे काय झालं हा तुला......?
 
  कसला विचार करतोय....!
           त्या वर तो मात्र खूप सावधगिरीने बोलला की काही नाही रे....! मि खूप दा मुलां-मुलींना या वाटिका कडं तर काही प्रियसी-प्रियकरांना प्रेमाचा वर्षांव करताना बघतो.
    त्या वर मी बोललो.....हो त्यात तू का एवढा अस्थिर झालासं ?
    ती म्हणाला नाहीं नाहीं..... मला काही अडचण नाहीं परंतु एक निदर्शनास आलंय हा.....!
       मी म्हणालो काय तर......आपल्याला मिळालेल्या स्वा तनत्र्याचा मात्र सौराचार होतोय....

      मी म्हटलं कसा..... नाही म्हणजे ते जे करताय हे त्यांच्या परीने योग्यचं. परंतु मी मागील बऱ्याच महिन्यांपूर्वी न बघतोय की याचं वाटीके ला येऊन ठेवणारी अनेक जोडपी मी खुद्द प्रेमाचा वर्षाव करताना बघितली.ते सारे जोडप्याने निच यायचे खरें मात्र जोडीदार हा मात्र नेहमीचं बदलत दिसला मला.....!मी म्हटलं अरे उगाच चं काय बोलतोय....?असं काही नाही हा....ती म्हणाला अरे खरंच हे सारं खरंय.
तुला मी बोललेले खोटं च वाटेल म्हणून चल माझ्या मागं मी दाखवितो तुला असं म्हणत त्यांनी मला पूर्ण चौपाटी पायी पिटवली परंतु त्याचा तो तिळमात्र संशय मात्र माझ्या ही ठाईमनी रुजून बसला.

        खरंच ना किती आमूलाग्र हा बदल जसे ऋतू बदलतात तसें इथं आम्ही जोडीदार बादलताना बघितले.... अगणित शोकांकिता हा.....!कुठं नीतिमत्ता उतलीच नाहीं कीं काय आणि आपण खरंच कलियुगात वास्तव्य करतोय याची मात्र आम्हांला तेंव्हाच पोच पावती मिळाली. आपल्या सर्व तत्वांचा आणि संस्काराचा गळा घोटत ती सर्वत्र हरकत करीत होती.आता या वर के बोलावे म्हणून मी माझ्यातील संयम-रावांना नव्याने बळकट करीत त्या वाटीके वरिल दुकानदारांचा आणि विक्रेत्यांचा थोडा विचार केला, जे कुणी होते त्यांचा नि माझा अर्थाअर्थही संबंध नाही परंतु २ पैसे मागे पडण्याच्या प्रामाणिक हेतूने आज ते सर्व घर-दार सोडून आपल्या जन्मभूमी च पलायन करीत इथं सेवेत रुजू होते.आम्ही तर कामानिमित्ताने त्यांचे बांधील होतो मात्र त्या अनेक अश्या प्रियसी-प्रियकराच्या जोड्या त्यांचे आर्थिक समीकरण बळकट करीत आज त्यांच्या बऱ्याच गरजा पूर्ण करीत होते.

        जर आज त्याचं प्रेमाने प्रयसी नि प्रियकर सत्यत्याने त्या वाटीके भोवती आपले प्रेम उधळन्यासाठी जात असतील तर मला वयक्तिक तरी खूप आनंद आहे कारण......
    
      प्रेमाने पोट जरी भरत नसलं तरी......
  
       आज त्याचं प्रेमाची चाहूल त्या जोडप्यांना वाटिका गाठायला लावते आणि गाठलेली वाटिका त्या सर्व विक्रेत्यांना अनेक आर्थिक समीकरण बनवत,त्यांना बळकट बनविते बाकी एका निस्वार्थी मनानी मला काही नकोय.....

       मग जाऊ द्या ती नीतिमत्ता नि ते उत्कट संस्कार त्याचं बघू हो समोर असं उपहासात्मक बोलून मी माझ्या मित्राला सडेतोड त्रासातून क्षणभर मुक्त केलं.....!
   आम्ही तरी हे असलं दृष्य आज च बघितलं त्याचा जो त्रास झाला काही सा पुन्हा नव्याने भ्रमनिरास झाला ते जाऊ द्या..... परंतु या सर्व उघड्या प्रकाराला मात्र तिचं एकटी ठामपणे साक्षीदार आहे.....

      
      कोण कुणा सोबत येतंय....
      किती दा येतंय.....
      नेमकी कोणती जोडी खरी...........
   
        अशी अनेक निउत्तरी प्रश्नाची उत्तरे त्या वाटीके कडे मात्र बिनचूक आणि सबळ च असावी......म्हणूनच मला म्हणावंस वाटत यं की,

   अनेकांच्या अनेक अश्या नात्यांना साक्ष ठरणारी हिचं ती वाटिका....!

धन्यवाद....!


टिप: - वाटिका हे चौपाटी प्रमाणे विरंगुळा करता येईल असे रमणीय स्थळ आहे.आणि जो मचकूर नमूद केलाय त्याचा आणि वास्तविकते सोबत कुठलाच सहसंबंध नाही.सारे काही काल्पनिक.....☺

5 comments:

Unknown said...

💙💙💙

Jagruti kalambe said...
This comment has been removed by the author.
Jagruti kalambe said...

Nice 1 sir...

I'm A_B said...

Sahi kaha hai sir aapne💯💯

Hangmanktr said...

Sahi thaaa. Bhaaii