Powered By Blogger

Saturday, 8 July 2023

"ती आणि तो प्रकरण - ५" Betterment is the best policy but not EVERY TIME...!


          बदल हा असावा पण तो एकोएकी नि आमूलाग्र नसावा,खरं तर सवय नसते ती त्या प्रमानाबाह्य उत्कट भावना सहन करण्याची...... शेवटी झालं तेच....जे नकोस होतं परंतु आलिया भोगासी असावे सादर या म्हणीला सार्थ करण्यात आपलं सर्वस्व अर्पण करीत प्रियकर मात्र बेधुंद होऊन प्रियसीच्या आधीन होता.

      दुष्काळ हा कोरडा नसून केव्हां अतिवृष्टी मूळे ही दुष्काळ ओढवला जातो, आता त्यांचा दुष्काळ कोणत्या प्रकारात मोडल्या जातो त्या बद्दल आपण विश्लेषण करणं म्हणजे त्या प्रियकराच्या ताज्या-तारुण्यात नाहलेल्या जखमांना मिठ चोळण्या सारखेचं आहें बघा.ज्या प्रमाणे उंदराला जशी ती चिंधी सापडते आणि त्याचं चिंधीचा त्या उंदराने केलेला सर्वत्र भोभाटा तिचं हुबेहूब परिस्थिती आज प्रियकराने स्वतःवर ओढवून घेतलेली होती.आपल्या जीवापाड त्यानें प्रयसीला जपलं,जीव ओतला,तिचं प्रत्येक सुख-दुःख हे स्वतःच चं समजत प्रियकर बिनधास्त त्या सुंदर दिसणाऱ्या परंतु खडतर आणि काटेरी रस्त्याने मार्गस्थ होता.

          तसं इतिहासात डोकावलं तर फार काळ हीं नव्हता तसा यांना एकमेकांना समजून घेण्यात परंतु या अल्प अवधीत नको नको तेंच घडून आलं होतं.कुठं तरी नको ती संशयाची ठिणगी हळूच येऊन ठेपली होती फक्त तिला ज्वलनास प्रतिकूल परिस्थिती अजून तरी पूरक नव्हती चं. कुणी सांगावं आणि त्या वरती प्रियकराने सहज चं विश्वास करावं हे तर अशक्य चं हा...! कारण प्रियसीच्या प्रेमाच्या सावलीत प्रियकर मात्र चांगलाच न्हाहून निघाला होता.तिने अध्यादेश काढावेत आणि प्रियकराने ते क्षणाचाही विलंब न होता पूर्णत्वास न्यावे हाच त्यांचा नित्यक्रम बाकी मात्र ठरलेला होता.सुरुवात तर फार सुरेख आणि सुंदर चं झाली हो मात्र ती वेळ कदाजीत पुरेशी नसावी कारण.....
"नात पूर्णत्वास कसे जाणार यांची तिळमात्र शास्वती ही त्या नात्याच्या सुरुवातीवर चं अवलंबून असतें"
मग ते नातं कुठलंही असो...!

            नाती ही फार बारकाईने जपावी नाही तर एकदा गेलेली तळा ही एका क्षणार्धात चं सारं होत्याचं नव्हतं करण्यात विलंब लागतं नाही.
"ज्या प्रमाणे आई आपल्या जवजात बाळाला जपते ना हुबेहूब तशीच नाती जपावी नाही तर उगाच चं कशाला औपचारिकतेचे धडे गिरवावे."

          ज्या प्रमाणे पर्भब्रह्म पांडुरंगाचे भक्त त्यांच्या भगवंताची आषाढी एकादशीला दर्शनासाठी तिव्र भावनेनं वत बघतात नां तिचं भावना जागवत प्रियकर ही प्रियसीच्या भेटी ची आणि दोन प्रेमाचे शब्द हितगुज करण्याची वत बघत असें. तसें रोज भेटीगाठी होतील असं काही नाही कारण ती दोघे एका महाविद्यालयात जरी शिक्षणास असले तरी त्यांचे विभाग मात्र निराळेचं होतें. केव्हा ही वेळे आधी वर्गामध्ये न हजेरी लावणारा हा प्रेमवेडा मात्र तिच्या त्या लाजऱ्या स्मितहास्या साठी मात्र वेळेलाही मागे सारत पुढे धाव घेऊ लागला.

       परंतु सगळं काही सुरळीत फार काळ कसचं हो टिकणार तेंच आता इथं होणार होतं,
            
                         ना होकार द्यायचा... ना नकार....!


         मात्र सेवा-कार्य पूर्णच करून घ्यावे ही स्वार्थी भावना कुठंतरी प्रियसीच्या मनात खंबीर होती.पूर्ण पडताळणी होण्याआधी चं मी कशी चं याला होकार घालू आणि याच्या पेक्षा ही परिपूर्ण मिळाला तर याचं संकुचित आशेवर ती जगत तर इकडं प्रियकर देवदास होण्याच्या मार्गावर चं होते.खरं एका सुसंकृत मुलीने हा विचार का न बरं करावं ? मात्र यात त्या निर्दोष प्रियकराच्या भ्रमनिरास चं काय ? जसं वयानुसार आपलें वडिल सगळं काही आपल्या पदरी बहाल करतात ना तसंच या प्रियकराने प्रियसिस सर्वस्व अर्पण केलं होतं.

       Betterment हे असावं खरं मात्र ते भावनांशी खेळणार नसावं, फार विचित्र अशीं परिस्थिती ओढवणार ते सारं होतं. आज वर आम्हीं ही Betterment ला बळी गेलोय खरें परंतु अश्या भावना बहाल करून नव्हेचं आणि असाच काहीसा निर्दयी प्रकार त्या प्रियसी कडून घडत होता.

       या प्रकाराला बळकट करणाऱ्या तिरस्कारी घटना ही कारणीभूत होत्या चं, त्या प्रियसीचं याला वेळवेकी टाळणं हेही आता वाढलं च होतं.एक आठवण म्हणून यांनी तिला कॉल करावा आणि तिचा बिनधास्त कॉल व्यस्त यावा,इत्यादी बाबींचा हा घेरावा काही सहज नसावा. आणि आता याचं सर्व घटना एकाएकी येऊन ठेपल्या तर त्यास अजून ही सबळ करणारी ती बिन-बुळाची रिकामी लोक त्या प्रियकराला धास्ताहुन सोडत.

   नेमकं कुणाचं खरं नि कुणाचं खोटं हे मात्र गुलदस्त्यात च बरं हा......एक लेखक म्हणून मला ही या प्रकरणात रजा बहाल करा आणि ईश्वराला नकमस्तक होऊन त्या भ्रमास बळी पडलेल्या प्रियकरासाठी प्रार्थना करा. 

"Betterment is the best policy but not EVERY TIME"

धन्यवाद....☺

7 comments:

Saurav Kohale said...

Bhava mast lihila 👍👌

Anonymous said...

#अप्रतिम����❤

Rushikesh waghmare said...

अप्रतिम 👌

Anonymous said...

सागर दादा👌👌

Diksha kale said...
This comment has been removed by the author.
Diksha kale said...

Just wow..Every time you write something new,but how can you write so effortlessly.

Unknown said...

He has great experienced about all these situations dear....that's why he can write such bloggs so effortleesly...अनुभवाचे बोल ज्याला म्हणतात ना त्यातलाच हा एक प्रकार...🙏