Powered By Blogger

Friday, 31 August 2018

ती आणि तो...... प्रकरण-१."आम्ही दोघे गप्पचं होतो तरी ती चौघें गप्पा रंगवत होते"



     एरव्ही त्यांचं ते भेटणं हे काही नव्यानं नव्हतं, या आधी ही बरेच योगा-योगाने म्हणा किंवा जोर-जबरदस्तीने का होईना भेटीगाठी होत असत.या सर्व मांदियाळीत स्वतःविषयी कमी आणि इतर मंडळीच बोलकी रंजक टिप्पणी असे.

     खरं तर होऊ घातलेली ही भेट काही जवळीक साधं घातलेल्या मंडळींच्या विशेष प्रयत्नाने आणि अनेक टोचक समजुतीने साध्य होत होती.या भेटीचे पुरेपूर श्रेय हे फक्त आणि फक्त त्याचं दोघांचे आहे यात कुठंलीच दुमत नसावी.

    तसं बघता आपल्या मूळे बरेंच दा आपल्याचं सावंगड्यांना ईश्वरा सारखी प्रतीक्षा घालविणारा हा प्रियकर आज आपल्या प्रेमा साठी मात्र वेळेपूर्वीचं दारावरती हजेरी देऊन सलामी देत होता. भेटण्याची वेळ केव्हां उगवते नि जेव्हा नाही हीच बाब आज त्याला गंभीर समस्या म्हणून त्यांच्या मनात खतबल घालवत होती, कारण तर ती येणार होती.जी परिस्थिती या टोकाला होती तिचं बोंब दुसऱ्या टोकाला,तिकडं ही खतबल च मन खात होती.वेळेचा विपर्यास करणारे दोघे आज वेळेचे पुजारी होऊन बसले होते.याचं नवल वाटून घ्यावं ठेवढं पुरेच.

   आता कुणा साठी ही न थांबणारी ती वेळ आज ही ठराविक गतीने आल्या प्रमाणे जात ही होती.ठरलेली वेळ उगवली आणि शेवटी दोघे भेटले च एकदाचे.दोघांच्या पण मनात आनंद हा गगनात न मावणारा होता,स्मिथ हास्य उमटवत पुढील कार्यक्रमास ग्रीन सिग्नल रुजवला.ते दोघे जरी एक-मेकांत मंत्रमुग्ध असले तरी मार्गानं जाणाऱ्या प्रत्येक वाटेकरांची तिरडी नजर त्यांच्या वर दत्तक देऊन होती.परंतु या सर्व प्रकाराला घाबरून पलायन करण्या इतपत ही ते पोकळ नव्हते,साऱ्याच परिस्थिती ला दोन हात करत ते शेवटी त्या कॉफी कॅफे ला पोहचते झाले.

   बऱ्याच अनपेक्षित औपचारिकतेंच्या नंतर स्थानापन्न होत ते केवळ एक-मेकांना बघतच राहिले,या सर्व भानगडीत केव्हा तो वेटर येऊन ठेपला याचं भान च राहाल नाही.दोन आवाज देत त्यांनी त्यांना डीचकवींन्याचा आयशवी पर्यंत त्याच्या कडक हाऊन गेले होते.शेवटी त्या वेटर नि टेबल वाजवीत त्यांना त्या बांधनातन बाहेर खेचलं. तरी या दोन जीवांचा जीव एक-मेकांना बघण्या वाचून काही सुटत नव्हता.त्रासून त्या वेटर नि पुन्हा  उच्च स्वर गवसत ऑर्डर घेतली आणि बिचारा चालता झाला.

  ऑर्डर येई पर्यंत तर यांना काही काम नव्हतंच म्हणा शिवाय एक दुसऱ्यांना बघण्या वाचून आणि याच दुर्लभ क्षणाचा फायदा घेत त्यांनी आपली मनमानी पूर्णत्वास नेली.हळूचकन घाबरट आवाजात वेटर मध्यस्थी घालत निमित्य-मात्र ठरलेल्या कॉफी ची सांगता केली.

   या संपूर्ण भेटीतून मला एकच उमजल होत की, वास्तविक एक शब्द ही न पुट-पुटता त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या घडवून आणल्या होत्या आणि या सर्व प्रकरणाला कारणीभूत ठरले ते त्यांचे डोळे,जे तुम्हां आम्हां सर्वांनाच आहे फक्त त्यांचा उपयोग योग्य रित्या करता यावा जसे की या दोन निर्दोष जीवांनी या कॉफी च्या भेटी मात्र केला आहे.
खरंच.....
        

             "ते दोघे गप्पचं होतें, परंतु ती चौघें गप्पा रंगवत होते"



       औपचारिकता म्हणून वेटर नि बिल टेबला वरती आणून ठेवलं होतं,थोडी का होहिना पण आपल्या प्रियसी समोर वट मारावी या गडबळीत प्रियकरानं सेंट्रल आणि स्टेट GST सकट पूर्ण बिल मोठ्या दिमाखानं दिल सोबत त्या वेटर ला टीप ही टेकविले.

                चला तर आपण निघायला हवं.....


     असं ढासळत वाक्य तीनं उद्गारल आणि ते दोघे ही तिथन चालते झालें. परतीच्या प्रवासात सहज बोलता बोलता त्यांनी पुन्हा नव्यानं भेटण्याची आस त्यां दोघांनीही दर्शविली होती.
आता मानातन तर दोन्ही बाजूला पण प्रेमाची त्सुनामी गतिमान होत होती.


  असो ही तर त्यांची पहिलीच भेट होती,यात माझ कुठलाचं पात्र नाही फक्त जे मी त्या कॉफी कॅफे च्या अलिकडील बाकावर बसून चित्रित केलं तेच मी आपल्या समोर मांडण्याचा सढळ पर्यंत केला आहे.आणि ते दोघे असेच भेटत राहो हीच माझी ईश्वर चरणी प्रामाणिक प्रार्थना असेल.





हेच ते दोघे....



तर मग चला या प्रकरणात इथंच पूर्णविराम देऊन आपण सर्व त्यांच्या पुढील भेटीची वाट बघूया...


टीप: सदर प्रकरण मी रेखाटण्याचा पर्यंत केला आहे,या प्रकरणात कुणाचीही भावना दुखविण्याचा माझा कुठलाचं हेतु नाही;असल्यास तो केवळ योगायोग चं.
आणि हा प्रसंग एक काल्पनिक असून माझा आणि माझ्या संबंधितांचा कुठलाही रोल नाही.



Tuesday, 7 August 2018

"जे होते नि जे आहे यात केवढा फरक"

    


                  खरं तर आपण स्वीकारलेली कार्याची जवाबदारी लक्ष्यात घेता; ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी लागेल तो आटापिटा करत कुठलीच कमतरता भासणार नाही याची काळजी घेत होतो.
    तसं बघता संघटन घडवून आणण्यासाठी; आवश्यक ते धडे ही आम्ही बाल्य अवस्थेत च संस्कार रूपाने अंगिकारले होते;यात स्वतःचीच पाठ थोपटून घेत नाही तर ज्यांनी आमच्या वरती जे धडे गिरवले त्याचाच हा स्वबळ दाखला होता.

           नियोजना प्रमाणे तर सगळं काही सुरळीत च ठरलं होतं,हवी ती पूर्व कल्पना ही सर्व उच्च स्वाभिमानी मंडळींना होतीचं. भूतकाळातील कार्यांची यशस्वी इतिहास बघता तसं उगाचंच लांच्छनास्पद हिनवणार कुणी नव्हतं;परंतु त्या सामूहिक कार्यच स्वरूप बघता आमच्या सोबत वयक्तिक वाद निर्माण करत त्या सर्व समूहाला आमच्या विरुद्ध भडकविणारे अनेक चेहरे आम्हाला अडत होती.तरी संस्कारांची पायमल्ली न हाऊ देता; आपल्या सर्व आत्मसन्मानांचं विसर्जन करीत आम्ही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊनच हवी ती पाऊले उचलीत होतो.
   
       आमचे सर्व पाऊले ही कार्याला सिद्धीस नेण्याच्या दिशेनं वाटचाल करणारी होती,तरी त्यांच्या वर दोषा-रोपण करण्या इतपत आम्ही उंची गाठली नव्हती.शब्दाने शब्द वाढतो म्हणूनच आम्ही काही काळ बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या. या सर्व प्रकरणात मला त्याच्या आभ्रूस्ट त्या मी पणाची अनेक उदाहरणे बघायला मिळाली.
  
      दिवसांवर दिवसे आता ओलांडत होती आणि ती नियोजित वेळ; भर अंधारलेल्या गोंधळात त्या अपयशाची चाहूल देत होती.आता अर्धवट वाटेवरन सर्वांना राम-राम करणाऱ्यांन मध्ये आम्ही तरी मोडत नव्हतो आणि पलायन करून इतपत लाचार ही नव्हतो.

    ज्या प्रमाणे नाण्याच्या दोन बाजू आसतात ना,त्याच प्रमाणे या घटनेच्याही दोन बाजू होत्या.आमच्या बाजूने आम्ही सहल काही सावरण्यात भर देऊ इच्छित होतो तर दुसरी कंड अति हुषार समजल्या जाणारी ती उच्च आभ्रूस्ट मंडळी स्वतःचा स्वाभिमान जपण्यात मग्न होती.तस बघता व्यक्ती हा कुठल्याही क्षेत्रातील असो समर्थकांनच्या सोबतीने त्याला प्रति-स्पर्धक ही त्याचं संख्येने लाभतात,असलंच काहीसं समीकरण आता मला लागू होणार होत.
    
    वेळोवेळी स्तुती-सुमने गाणारी जवळ जवळचिंच मंडळी आता अफजल खानच्या भूमिकेत येऊन पाठीवर वार करू लागकी होती.त्याच्या या बदलत्या भूमिकेचे संकेत ही आम्हाला आधीच सूचक झालें होते परंतु माया रुपी अति-विश्वासाने आम्हाला आंधळं स केलं होतं.

   कुठलंही काम असो आधी त्या कामाचा/कार्याचा उद्देश हा सार्थकी लावणे हाच आमचा ही प्रामाणिक उद्देश होता; परिणामी याच उच्च-ध्येय वाटचाली मुळं पदरी आलेल्या नाव  नौकिकता फळा आली असावी.आणी याचं नावाचा तिरस्कार करणारी मंडळी तीव्र संखेने वाढीस लागली होती,हा सर्व प्रकार आमच्या समोर घडत असतांना सुद्धा आम्ही त्या अति-विश्वासाच्या विश्वात भरावलेलो होतो आणि अंतिमतः स्वकीयांकडनच भ्रमनार्थ होत राहिलो....
      
         आता या सर्व बाबींचा विचार करता एक च बोलासव वाटत की,
       
          

          "जे होते नि जे आहे यात केवढा फरक"....!


    
         हाच फरक जर आमच्या ध्यानीं-मनीं त्या क्षणी आला नाही  परिणामी पुन्हा एकदा आम्ही भ्रमनार्थी पडलो.आता हीच घोडचूक लक्ष्यात घेता योग्य वेळी त्या सर्व पाठीवरच्या वारकऱ्यांना अर्थातच शिखंडी अफजलांना ओळखा आणि आपली सुटका करा.....!



Add caption