सुखोस्तर साध्य
होईल,अशी कुठलीच साधिका या भू-तलावर तरी साध्य होत नाही.असे बरेच दा
थोरा-मोठ्यांच्या सूचक वाणीतन ऐकण्यास आले बरें, तेच त्याला अनुभवी आले असावे. आता
लक्ष जरी स्पष्ट झालं असलं तरी ,अत्यंत खळतर मार्मिकतेच्या मार्गानं स्वतःला सावरत
मार्गस्थ करणं काही सहज नव्हतं.तरी तिला साध्य करण्यात आता एक प्रियकर म्हणून तो
प्रयन्त-वादा वरती नव्यानं विश्वास ठेवतं रुजू झाला.
मागील भेटी-मुळे
त्यांनी आता किंचितशी जवळीकता साधली होती,याचं जवळीकतेला साधर्ममय ठरवतं, ते
एकमेकांना त्यांच्या व्यग्र जिवन शैलीतन वेळ देऊ लागले, गप्पा रंगवू लागले.या सर्व
प्रकारणात दोघांनी पण तारेवरची कसरत केली,कारण आता रोज नव्यानं एक कथित नाट्य हे
त्यांच्या समोर दस्तक देत होत.
खरं तर भेटत हे होते,मने यांची जुळत होती,तरी जळत इतरांची होती."मला न तुला घाल कुत्र्याला",अश्या विवेकमय बुद्धिमत्ते चें धनी आता या दोघांवर तिरडी नजर ठेवून होतें. तंत्रज्ञानाने अद्यायत असलेल्या CCTV सिस्टिम पेक्षाही ही काटेकोर तापशीलतेचा पंचनामा यांच्या कडन पसरल्या जाऊ लागला होता,हे सगळे उद्योग करण्या इतपत वेळ ही त्यांच्या कडं होतीचं तर याच वेळेचा सदुपयोग करत त्यांनी विनामूल्य त्यांची प्रसिद्धी जोर धरू लागली होती.आता THIRD PARTY कडन जस्यास तसें फार क्वचित च एकाला मिळत तसंच इथंही अनुभवास आलं.प्रत्येक गोष्टीला दोन गोष्टी नव्याने जोडत ते त्यांची प्रसिद्धी जोरात करीत होते.असो आता हे तरी पुरेच.....
काही बहाद्दरांनी
तर जखमेवर मीठ चोळण्याची बोचरी कामे हातात घेतली होती, ती म्हणजे कान भरणी ची.नको
तिथं नाक खुपसणारी ही लोकं आता त्या प्रियसी कंड, केव्हा निमित्ताने तर केव्हा
औपचारिक निमित्य बनवत भेटी-गाठी घेऊ लागली होती. आणि निघता निघता का होईना परंतु
आपल्या वकिलीचे विनामूल्य सल्ले देत ते खलील प्रसंग कथित करून आणत होतें....
हे बघ...माझं काही नाही हा!
परंतु तो मुलगा ना मला काही ठीक वाटत नाहीय,या आधी पण त्याचे बरेच प्रकरण आम्ही स्वतःच मिटवली आहेत ग. आणि तू किती छान आहेस आणि तो बघ कसला आला.....
काही चं स्टॅण्डर्ड नाही त्या मुलाचं....
तुला तर विराट च मिळावा ग......(तेवढे बरे विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालेलं होते नाही तर या बाईंनी विराट कड सुद्धा शिफारस केली असती कि काय ?)
नको विचार करू याचा,नाही बघ हा तू शेवटी तुला च निर्णीय द्यावा लागेल. चल तर मग मी निघते हा,काळजी घे....!!!
हे बघ...माझं काही नाही हा!
परंतु तो मुलगा ना मला काही ठीक वाटत नाहीय,या आधी पण त्याचे बरेच प्रकरण आम्ही स्वतःच मिटवली आहेत ग. आणि तू किती छान आहेस आणि तो बघ कसला आला.....
काही चं स्टॅण्डर्ड नाही त्या मुलाचं....
तुला तर विराट च मिळावा ग......(तेवढे बरे विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालेलं होते नाही तर या बाईंनी विराट कड सुद्धा शिफारस केली असती कि काय ?)
नको विचार करू याचा,नाही बघ हा तू शेवटी तुला च निर्णीय द्यावा लागेल. चल तर मग मी निघते हा,काळजी घे....!!!
झालं हे ऐकून ती तर
चालती झाली बरी, परंतु जाता-जाता अलगतशी ठिणगी लावत तिने आग लावली आणि आपलंसं
मोकळी चं झाली खरी.परंतू आता प्रश्न होता तो त्या तोतया मुलीने पेरलेल्या
अविश्वासाचा, की खरंच तो मुलगा अर्थात प्रियकर वाईट असावा,कारण इतके सारे लोकं खोट
तर बोलणार नाही ना?याच विचारात तिने आता त्याचा संपूर्ण पंचनामा हाती काढला
होता,त्याच्यावर नको नको ते संशय घेत त्याला धाऱ्यावर घेत कुठं तरी प्रेमाने
चाललेला हा निर्मळ प्रवास याचं कान भरणी प्रकार मुळं च बिथरला होता.
एक नव्हे, दोन
नव्हे तर अनेक उलटं-सुलट चर्चांना आता ती सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया देत
त्यालाचं वाईट ठरवतं सर्वत्र पाणी फेरत गेली.
वास्तविक बघता
खर-खोटं काय याची प्रमाणता काय हे बघणं इथं महत्वाचं जरी असलं तरी आता दोघांच्या
पण मनाला तळा गेलीच होतीं.असो झालेला प्रकार हा पूर्णपणे अनपेक्षित असून एक नवीन
मोड आणणारा होता,आता समोर या नात्याला काय दिशा मिळणार हे तर गुलदस्त्यात चं होत.असो या
घटनेवर प्रियकर स्वतःहून आपलं मौन सोडण्या इतपत बळकट नव्हता आणि ती आता काय करत
असणार याचं प्रश्नांच कोड मणी बाळगत तो फक्त बोलत गेला......की,
"तू जेवढ समजतेस ना तेवढा वाईट नाही ग मी".......!
![]() |
| हाच तो कान भरणी चा प्रकार.... |
👫असो तरी आता त्यांच्या हातात काही नव्हतं शिवाय तिला झुरल्या शिवाय...!असो आपण काय शेवटी जे दिसत ते नमूद करून मोकळे झालोत आणि त्यांच्या नात्याला नव्याने कुठलं स्वरूप प्राप्त होणार याच्याच विचार करित पुढील बघत बसलो.

